Sunday, September 7, 2008

च्यायला!!!! आज काळ पुन्हा सपशेल जिंकला!!!

च्यायला!!!! आज काळ पुन्हा सपशेल जिंकला!!!काळी मनी माझ्याकडे आली,थोडी थांबली अन रड रड रडली,मला म्हंटली बघ ना रे,त्याने मला आधीच रंग काळा दिला,कोणी मला जवळ घेत नाही,मी दिसले तरी पुढे कोणी चालत नाही,तुच सांग ना मी काय एवढी वाईट आहे,अगदीच त्या स्वार्थी माणसांसारखी नाही ना......अरे हेच काय कमी दुःख होते,त्याने माझे डोळे रंगीत केले,काळोखात दुध चोरायला जायची पण चोरी का?कधी गेलीच तर लांबुनच कळते,भित्र्या त्या माणसाला पाहुन मग पळते,तुच सांग ना मी काय एवढी वाईट आहे,अगदीच त्या पळकुट्या माणसांसारखी नाही ना.....तेवढ्यातच काळाची स्वारी आली,तो मनीकडे पाहुन म्हणाला,मला कळले आजही त्याने मला हुलविले,म्हणे, ये मने विसरलीस का ग,काल काळोखात जेव्हा घार आली होती,तेव्हा तुच तर पिलाला वाचवलंस,त्याला तोंडात घेउन दुर पळालीस....मग जरा आठव,तु तुझ्या काळ्या पिलाला कसं ओळखलंस????हे आठवुन,मनी बिचारी स्तब्ध वाटेने निघुन गेली.....मी मनात म्हंटले,च्यायला!!!! आज काळ पुन्हा सपशेल जिंकला!!!मग मी काळाला हुलकावणी देउन काळोखात निसटलो......

No comments: